Saturday, January 20, 2007

ओंजळ माझी

भिजलेल्या मनाचा गहिवर
कंठातून दाटून येतो
आणि मग आसवांचा पाऊस
अनावर होतो

मुकेपणा नाही रे त्याला
बांध फुटून कोसळतं सारं
फक्त तूच हवा असतोस त्यावेळी
बाकी व्यर्थ असतं सारं

रुजलास इतक्या खोलवर
अगदी वटवृक्षासारखा पसरलास
प्रत्येक पारंबीच्या मूळाशी तुझा
एक विलक्षण इतिहास

आठवक्षणांची ओंजळ माझी
तुडूंब, काठोकाठ भरलेली
एकही क्षण झिरपू नये म्हणून
कायम जीवापाड जपलेली

जयश्री

2 comments:

Anonymous said...

खूप छान कविता!!

Anonymous said...

आवडली.

रुजलास इतक्या खोलवर
अगदी वटवृक्षासारखा पसरलास
प्रत्येक पारंबीच्या मूळाशी तुझा
एक विलक्षण इतिहास

ह्या ओळी मस्तच.

प्रमोद देव